आहारातील काही पदार्थ जे ठेवतील तुम्हाला निरोगी आणि वाढवतील तुमची रोग प्रतिकारशक्ती

               आरोग्यदायी जीवनासाठी काही आहारातील पदार्थ   


सध्या आरोग्याला घेऊन सगळेच चिंतेत आहेत. रोग प्रतिकार शक्ती कशी वाढावी याकडे सर्वांचा कहल वाढला . तर या ब्लॉगमध्ये आपल्याला रोग प्रतिकार शक्ती आणि चांगल्या आरोग्यासाठी काही आहाराचे पदार्थ याची माहिती दिली आहे. पुढीलप्रमाणे 

 १ ) दही : दह्यामध्ये आपल्या शरीरास आवश्यक असलेले बॅक्टेरीया असतात . अन्नातले न्युट्रीएंट्स शोषून घेण्याचे ते काम करतात . त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते . तसेच दह्यामध्ये कॅलशियम , पोटॅशियम , प्रोटीन व व्हिटॅमिन बी असते .




 २ ) लिंबू : - लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते . सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते . लिंबाचा रोज आहारात समावेश केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते . तसेच सर्दी तापापासून बचाव होतो . शरीरातील दुषितांचा निचरा होऊन रक्तही शुद्ध होते . 

३ ) हिरव्या पालेभाज्या : - हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम , पोटॅशियम , लोह , व्हिटॅमिन के असते . हिरव्या पालेभाज्या किंवा त्यांचे सूप हे नित्य आहारात जरुर ठेवावे . त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते व हाडेही मजबूत होतात . 


४ ) पालक ( Spinach ) : - पालकामध्ये व्हिटॅमिन सी व ए भरपूर प्रमाणात असतात . त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी व त्वचेवर चकाकी येण्यासाठी त्याचा उपयोग होतो . पालकामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो . तसेच अॅनिमिया या रोगासाठी खास मदत होते व स्नायूही मजबूत होतात .



 ५ ) वाटाणा Green pease : - हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन सी , ई व के मुबलक प्रमाणात असते . त्यामध्ये थोड्या प्रमाणात कॅलरीज् असतात . त्यामुळे वजन वाढलेल्यांचे वजन कमी होऊ शकते . तसेच लोह , पोटॅशियम व फॉस्फरस  असते . त्यामुळे शरीराचे detoxification होते . 

६ ) गाजर : - गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते . त्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींमध्ये वाढ होते व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते . गाजर भरपूर प्रमाणात शरीरास चोथा तत्व देते . रोज गाजराचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते . 

७ ) कोबी : - कोबी त्वचेसाठी व डोळ्यांसाठी अत्यंत उत्तम आहे . कारण त्यात व्हिटॅमिन ए आहे . कोबीची भाजी आवडत नसणाऱ्यांनी तो सलाडमध्ये कच्चा तरी जरुर खावा . स्नायूच्या विकासासाठी कोबी अत्यंत उपयुक्त आहे . तसेच फुफ्फुसे व पोटाचे आरोग्यही कोबीच्या आहारात समाविष्ट केल्याने सुधारते . 

८ ) कड द्यान्या  Bean Sprout : - कोशिंबरी ( सॅलड ) वर मूग , मटकी अशा कडधान्याचे भरड केलेले कण पसरल्यास किंवा सकाळ , दुपारच्या नाश्त्यामधल्या पदार्थांत द्विदल धान्यांचा उपयोग पौष्टिक ठरु शकतो.ही द्विदल धान्ये ' क ' ( सी ) व्हिटॅमिन ( जीवनद्रव्य ) युक्त असून थोडा फार ताज्या द्विदल धान्याचा उपयोग रोजची ' क ' ( सी ) व्हिटॅमिनची जरुरी पुरी करु शकतो . याशिवाय या द्विदल धान्यात व्हिटॅमिन ( जीवनद्रव्य ) अ , ब आणि इ ( ए . बी आणि ई ) , तसेच कॅल्शियम , आयर्न व पोटॅशियम घटक असतातच .

 ९ ) कांदा : - कांद्याचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो अन्नपदार्थाची चव वाढवतो . पण कांद्याचा हा एकच गुणधर्म नाही , त्याचे औषधी गुणधर्मही आहेत . नियमीत कांदा खाल्याने वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमित होते व त्यामुळे हार्टअॅटॅकचा धोका कमी होतो . कांदा नियमित खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कमी होते . रक्तातल्या गुठळ्या विरघळतात , रक्त पातळ रहाते . 


१० ) भोपळा : भोपल्यामध्ये विटामिन्स,मिनरल्सआणि फायबर्स असे सर्व anti oridants असतात जे आपल्याला आरोग्यपूर्ण व तरुण रहाण्यास मदत करतात .भोपळा चेहऱ्यावर लेप करून लावल्यास त्वचा मुलायम राहण्यास मदत होते . तव्चे वरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते .



११ ) टॉमॅटो : - टॉमॅटोमध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स् आणि मिनरल्स् असतात . टॉमॅटो कच्चा खाल्ला काय किंवा शिजवून खाल्ला काय , तो अत्यंत न्यूट्रीशस असतो . टॉमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व दृष्टी सुधारते . डायबिटीस असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यास मदत करते . टॉमॅटोमध्ये असलेल्या ए व सी या जीवनसत्वांमुळे पेशींचे आरोग्य सुधारते . व्हिटॅमिन बी व पोटॅशियममुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व रक्तदाबही नियंत्रित रहातो . टॉमॅटोमधील व्हिटॅमिन के व कॅल्शियममुळे , तो नियमीत आहारात ठेवल्याने हाडेही मजबूत होतात . 



१२ ) लसूण ( Garlic ) : - लसूणात अलायसिन ( allian ) आणि सियोन ( cyoene ) नावाचे घटक असतात . हे घटक रोगट जंतूंची वाढ रोखतात . लसूण रसही जखमा किंवा जखमेतल्या जंतूंची वाढ रोखण्यास अतिशय उपयोगी आहे . लसणातला अलायसिन नावाचा जरासा तेलकट वास असणारा घटक जंतूनाशाला मदत करणारा ठरतो . रोज दोन किवा तीन लसूण पाकळ्या आहारात ठेवणे उचित ठरते . सर्व जगभर स्वयंपाकात लसूण वापरला जातोच . म्हणूनच रोजच्या आहारात लसणाचा सहभाग असणे योग्य . हृदयाचे कार्य योग्य चालण्यास केवळ मदत इतकेच नव्हे , तर संपूर्ण हृदयप्रक्रिया उत्तम त - हेने चालण्यास लसणाची मदत होते . रोजच्या अन्नात लसूणाचा उपयोग केल्यास रक्ताशी संबंधीत आजार कमी होण्यात मदत होते . रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास लसूण उपयोगी पडतो हे मधुमेहींना दिलासा देणारे आहे . उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी लसूणाची कॅप्सूल घेतल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते . नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की लसूण जंतूनाशक असल्याने दातदुखी थांबवण्यासाठी लसणाचा उपयोग होऊ शकेल . लसणाचे तेल किंवा केवळ लसणाची पाकळी दाताच्या दुखऱ्या भागावर चोळावी . सर्दी खोकल्यावरही लसूण उपयोगी ठरुन तो सशक्त शरीर रचनेसाठी आवश्यक आहे . अभ्यासात असे दिसते की लसूण रक्तातील कॅन्सर वाढवणारे घटक मर्यादित करुन ट्युमर सेल कमी करु शकतात.

१३ ) संत्री : - संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते . त्यामुळे सर्दी तापापासून ते आपल्याला वाचवते . त्याचप्रमाणे त्यामध्ये चोथा तत्व भरपूर असते . त्यामुळे अन्न पचनासाठी त्याचा उपयोग होतो . सकाळच्या न्याहारीमध्ये संत्र्याचा रस घेतल्यास वजन कमी करण्यास त्याचा उपयोग होतो . पण शक्यतो ही फळं तशीच खावीत . कारण त्यामुळे चोथाही शरीरास मिळतो व रसही मिळतो .


१४ ) द्राक्ष : - द्राक्ष काळी किंवा हिरवी कुठलीही असली तरी त्याच्यातले गुणधर्म साधारण सारखेच असतात . द्राक्षांमध्ये मँगेनीजचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास अटकाव होतो . तसेच हे खजिन हाडांना मजबूत बनवते . रक्तात सारखेचे प्रमाण नियंत्रीत ठेवते व मेंदूचे काम सुरळीत ठेवण्यास मदत करते . द्राक्षात जवळजवळ ७५ % पाणी असते . त्यामुळे ऋतुनुसार जेवणानंतर द्राक्षं जरुर खावीत . तसेच व्हिटॅमिन ए , बी , सी , ई आणि के तसेच कॅल्शियम पोटॅशियम ही आहारमूल्ये द्राक्षांत असतात . खेळाडूंना एनर्जी वाढवण्यासाठी द्राक्ष खाणे अत्यंत फायदेशीर ठरते . हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासही द्राक्षांचे सेवन केल्याने उपयोग होतो . 


१५ ) सफरचंद : - An apple a day , keeps doctor away ! असं म्हटलेलंच आहे . कारण त्यात व्हिटॅमिन सी , आयर्न , पोटॅशियम , सोडीयम , फॉस्फरस , कॅल्शियम , सल्फर इत्यादी घटक असल्याने त्याचं पोषणमुल्य खूप जास्त आहे . सफरचंदाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात व आतडी मजबूत होतात . तसेच सफरचंदात चोथा तत्व भरपूर प्रमाणात असते . ते सालासकटच खावे . त्यामुळे पचनक्रिया सुधारते .


 

१६ ) केळे : - केळ्यामध्ये पोटॅशियम , सोडीयम , क्लोरिन , आयर्न , ग्लुकोज , अमिनो ॲसिड , इ . आवश्यक पोषण द्रव्ये आहेत . यामुळे मलावरोध , अल्सर या रोगांसाठी ते खाणे उपयुक्त ठरते . केळ्यामुळे पचनसंस्था सुधारते .


 १७ ) पपई : - पपईमध्ये व्हिटॅमिन ए व ई , तसेच सिलीकॉन , पोटॅशियम , कॅल्शियम , कॉपर इत्यादी खनिजे असतात . पपईमुळे पचनकार्य सुधारते व आतडी सुदृढ होतात . मलावरोधाचा त्रास पपई खाल्याने कमी होतो . कॅन्सर , हृदयरोग , मोतीबिंदू इत्यादी रोग होण्याचा धोका कमी होतो . 

१८ ) अननस : - अननसामध्ये व्हिटॅमिन बी , सी आणि ई असते . तसेच फॉस्फरस , पोटॅशियम , आयर्न इत्यादी खनिजे असतात . अननसामुळे लघवीचे प्रमाण नियमीत होते . त्यामुळे शरीरातील उत्सर्जक घटक बाहेर जाण्यास मदत होते . पचनसंस्थेचे कार्य सुधारते तसेच रक्ताभिसरण वाढते व रक्त शुद्ध होते . 


१ ९ ) फणस ( Jackfruit ) :- फणसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी , ए व अॅन्डी ऑक्सीडंट्स असतात . त्यामुळे फणस खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते . त्यात पोटॅशियमही असल्याने रक्तदाब नियंत्रीत करण्यास ते मदत करते व हृदयविकार होण्यास अटकाव होऊ शकतो . चोथा तत्वामुळे पचनक्रियाही सुलभरित्या होते . नैसर्गिक साखर त्यात भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे एनर्जी मिळण्यासाठी फार उपयोग होतो . त्यात असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे त्वचेचे व डोळ्याचे आरोग्य टिकून रहाते . फणसाच्या बीयांमध्ये भरपूर प्रोटीन असते . त्यामुळे त्याही उकडून खाल्ल्या जातात .


२० ) आवळा : - आवळ्याला बहुगुणी म्हटले जाते . आवळ्यामध्ये जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे शरीर मजबूत होते . दृष्टी सुधारते . तसेच केसगळती थांबून केसांची वाढही होते . त्यामुळे आवळा रोज प्रत्येकाच्या आहारात समाविष्ट असला पाहिजे . आवळा तुरट व आंबट आहे . त्यामुळे पित्त , कफ व जुलाब अशा सर्व आजारांवर ते एक गुणकारी औषध आहे . आवळ्यामुळे वार्धक्य दूर होते . त्वचा चकाकते . पचनक्रिया व्यवस्थित चालते . दात मजबूत होतात . दृष्टी सुधारते . केस काळेभोर व मुलायम , मजबूत होतात . त्याचप्रमाणे हृदयरोग , मधुमेह , सर्दी खोकला , स्वप्नदोष , श्वेतपदर इत्यादी आजारांवरही उपायकारक आहे . स्मरणशक्ती वाढते व बुद्धी तल्लख होते . आवळा कुठल्याही स्थितीत खाल्ला तरी चालतो . कारण आवळा कापला , चिरला किंवा त्याची पावडर केली तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाहीत . थोडक्यात काय तर खूप आजारांवर आवळा हे गुणकारी औषध आहे . 

२१ ) अंजिर ( Fig ) : - अंजीर जरी ऋतुनुसार मिळणारे फळ असले तरी सुक्या मेव्यांच्या रुपात ते आपल्याला वर्षभर मिळते . त्यामध्ये ए व बी ही व्हिटॅमिन्स् व फॉस्फरस , कॅल्शियम , लोह , मँगेनिज इत्यादी खनिजे असतात . अंजिरात असलेल्या चोथा तत्वामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते . हाडांना मजबूती येते . रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत रहाते . अंजिरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्याने Anemia ( पंडूरोग ) या रोगावर ते उपायकारी ठरते . अंजिर आहारात समाविष्ट केल्याने थकवा नाहीसा होतो . तसेच मेंदू तल्लख होण्यास मदत होते . अंजिर कुस्करुन त्वचेवर लावल्याने त्वचाही तजेलदार होते व तारुण्य पिटीकांवरही एक उत्तम इलाज म्हणून ते उपयोगी आहे .


२२ ) तुळस ( Basil ) : - तुळशीला वनौषधी म्हटले जाते . त्यामध्ये व्हिटॅमिन ए असते . आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे खूप फायदे आहेत . सकाळी उठल्यावर ताजी तोडलेली तुळशीची दोन - तीन पाने रोज चावून खावीत . त्यामुळे सर्दी - तापापासून लांब रहाता येते व कोलेस्ट्रॉलही योग्य होण्यास मदत होते . घश्याचे कुठलेही विकार असतील तर तुळशीची पाने पाण्यात उकळून ते पाणी थोड्या थोड्या वेळाने घोट घोट प्यावे किंवा त्या पाण्याने गुळण्या कराव्यात . त्याचप्रमाणे रक्तशुद्धीचे महत्वाचे कार्यही तुळस करते . तुळशीची पाने वाळवून त्याची पावडर करुन ठेवावी . त्याने दात साफ करावेत . त्यामुळे दातांचे आरोग्य सुधारते . 


                              

२३ ) कोरफड ( Aloe vera ) : - कोरफड ही शारीरिक आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या , केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे . कोरफडीमध्ये ए , बी , सी आणि के इत्यादी व्हिटॅमिन्स् तसेच कॅल्शियम , मॅग्नेशियम , पोटॅशियम , कॉपर , सोडीयम , झिंक इत्यादी खनिजे असतात . त्यामुळे आपल्या शरीराची सर्व कार्य सुरळीत चालण्यासाठी तिचा उपयोग होतो . तसेच डायबिटीस असणाऱ्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यास ती उपयुक्त ठरते . कोरफडीचा रस दातांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे . कोरफडीचा गर चेहऱ्याला व केसांना लावल्यास त्यांचेही आरोग्य सुधारुन त्वचा चकाकते व केस गळती थांबून केसांची वाढही होते . कोरफडीचा रस सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व रोगप्रतिकारकशक्तीही वाढते .




धन्यवाद .........




Comments